तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील १००० वर्षांपूर्वी, चोला राजवटीत, साधारण २०-२५ वर्षांत बांधून पूर्ण केलेले बृहदीश्वर मंदिर हा भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक अचंबित करणारा नमुना आहे!
ह्या मंदिराच्या बाबतीतले हे आश्चर्यकारक मुद्दे :- मंदिरापासून ५० किलोमीटर त्रिज्येत ग्रॅनाइटची एकही खाण नसतानाही, ४४ एकरांवर पसरलेले हे मंदिर, संपूर्णपणे ग्रॅनाइट ह्या दगडात बांधले आहे! (हा हजारो टन ग्रॅनाइट कुठून आणला आणि कसा आणला, हे कोणालाही माहिती नाही.)
- मंदिराच्या कळसाची उंची ६६ मीटर (२१७) फूट आहे! (सध्याच्या मापकांप्रमाणे २२ मजली इमारतीएवढी उंची आहे!)
- मंदिराचा कळस आतून भरीव नाही आणि त्यात वापरलेले दगड हे कुठल्याही सिमेंट, काँक्रीट आणि/किंवा रसायनाच्या साह्याने एकमेकांवर बसवलेले नसून, सर्व दगड फक्त इंटरलॉकिंग पद्धतीने एकमेकांत गुंफून बसवले आहेत!
- मंदिराच्या शिखरावरचा कळस हा तब्बल ८० टन वजनाचा आणि एकाच प्रचंड शिळेतून (मोनोलिथ) बनवला आहे!
- एवढा प्रचंड कळस शिखरावर कसा चढवला आणि कसा बसवला, ह्याचे कुठलेच ज्ञान आज उपलब्ध नाही. ज्या थिअरीज आहेत, ते फक्त अंदाज आणि ठोकताळे आहेत.
१०१० वर्षांतील वादळवारे, धरणीकंप, नैसर्गिक झीज, ह्या सगळ्याला तोंड देत, आजही तो कळस भक्कमपणे उभा आहे!
आजचे कुठलेच स्थापत्यशास्त्र, भारतीय पुरातन स्थापत्यशास्त्राला तोंड देऊ शकणार नाही, एवढे भारतीय स्थापत्यशास्त्र पुढारलेले होते!
स्थापत्यशास्त्र सोडता, मंदिरातील ग्रॅनाइटवर केलेली अप्रतिम कलाकुसर हा तर एका वेगळ्याच पोस्टचा भाग होईल... त्याबद्दल परत कधी तरी...
- शरद केळकर
(तळटीपा :
- बृहदीश्वर, चेन्नकेशव, मदुराई वगैरे प्राचीन भारतीय मंदिरशास्त्राचे अक्षरशः शेकडो अप्रतिम नमुने भारतात असतानाही, तुलनेने फारच साध्या असणाऱ्या ताजमहालाची, जागतिक आश्चर्य म्हणून निवड कोणी आणि का केली असेल, हा अस्वस्थ करणारा प्रश्न कायम मनात येतो...
- फोटो स्रोत : ट्विटरवरील @TheGopalan आणि @LostTemple7 ही अकाउंट्स)